शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:00 IST

कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठात चर्चासत्रया धरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामात चार कोटी रुपयांची बचतसर्वसामान्यांच्या कामासाठी ते कुठलाही प्रोटोकॉल पाळत नसत.

कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामीण विकासात वसंतदादांचे मोठे योगदान राहिले आहे, अशा शब्दांत लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी वसंतदादांच्या कार्याचा गौरव केला.

वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, गांधी सेंटर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल रुरल डेव्हलपमेंट यांच्यावतीने आयोजित ‘ग्रामीण विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचे योगदान’ या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते.

राजा माने म्हणाले, वसंतदादांनी सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेत ग्रामीण विकासाचे काम केले. सांगली परिसरात त्यांनी सहकारातून साखर कारखाना उभारला, तसेच ठिकठिकाणी पाणलोट क्षेत्र निर्माण केले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी ऊसशेतीकडे वळला. जायकवाडी धरणाचे काम करताना पाटबंधारे खात्याची धुरा वसंतदादांकडे होती. या धरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामात चार कोटी रुपयांची बचत बांधकाम अधिकाºयांनी केली होती.

यामुळे वसंतदादांनी तत्काळ धरणाचे काम करणाºया शिपाईपासून ते अधिकाºयांपर्यंत चार लाख रुपये बक्षीस म्हणून दिले होते. इतका त्यांचा कारभार पारदर्शी होता, असे माने म्हणाले. यावेळी दशरथ पारेकर म्हणाले, वसंतदादा माणूस म्हणून खूप मोठी व्यक्ती होती. सर्वसामान्यांच्या कामासाठी ते कुठलाही प्रोटोकॉल पाळत नसत. जिथल्या तिथे ते काम निपटत असत. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात तणाव असला तरी एकोपा होता.चर्चासत्रात प्रा. डॉ. भारती पाटील , प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनीही वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. चर्चासत्राचे आयोजन प्रा. गजानन साळुंखे, प्रा. वैशाली भोसले यांनी केले होते.उचित स्मारकाची खंतवसंतदादांनी राज्यासाठी मोठे योगदान दिले असले तरी, राज्य सरकारने त्यांच्या कार्याला शोभेल असे उचित स्मारक उभारले नसल्याची खंतही राजा माने यांनी यावेळी व्यक्त केली.