शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:00 IST

कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठात चर्चासत्रया धरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामात चार कोटी रुपयांची बचतसर्वसामान्यांच्या कामासाठी ते कुठलाही प्रोटोकॉल पाळत नसत.

कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामीण विकासात वसंतदादांचे मोठे योगदान राहिले आहे, अशा शब्दांत लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी वसंतदादांच्या कार्याचा गौरव केला.

वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, गांधी सेंटर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल रुरल डेव्हलपमेंट यांच्यावतीने आयोजित ‘ग्रामीण विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचे योगदान’ या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते.

राजा माने म्हणाले, वसंतदादांनी सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेत ग्रामीण विकासाचे काम केले. सांगली परिसरात त्यांनी सहकारातून साखर कारखाना उभारला, तसेच ठिकठिकाणी पाणलोट क्षेत्र निर्माण केले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी ऊसशेतीकडे वळला. जायकवाडी धरणाचे काम करताना पाटबंधारे खात्याची धुरा वसंतदादांकडे होती. या धरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामात चार कोटी रुपयांची बचत बांधकाम अधिकाºयांनी केली होती.

यामुळे वसंतदादांनी तत्काळ धरणाचे काम करणाºया शिपाईपासून ते अधिकाºयांपर्यंत चार लाख रुपये बक्षीस म्हणून दिले होते. इतका त्यांचा कारभार पारदर्शी होता, असे माने म्हणाले. यावेळी दशरथ पारेकर म्हणाले, वसंतदादा माणूस म्हणून खूप मोठी व्यक्ती होती. सर्वसामान्यांच्या कामासाठी ते कुठलाही प्रोटोकॉल पाळत नसत. जिथल्या तिथे ते काम निपटत असत. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात तणाव असला तरी एकोपा होता.चर्चासत्रात प्रा. डॉ. भारती पाटील , प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनीही वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. चर्चासत्राचे आयोजन प्रा. गजानन साळुंखे, प्रा. वैशाली भोसले यांनी केले होते.उचित स्मारकाची खंतवसंतदादांनी राज्यासाठी मोठे योगदान दिले असले तरी, राज्य सरकारने त्यांच्या कार्याला शोभेल असे उचित स्मारक उभारले नसल्याची खंतही राजा माने यांनी यावेळी व्यक्त केली.